सद्सदविवेकबुध्दीचा वापर करून केलेली कृती आणि उक्ती आत्मिक समाधान देते.
डॉ हनुमंत भोपाळे
सद्सदविवेकबुध्दीचा वापर करून केलेली कृती आणि उक्ती आत्मिक समाधान देते.
असे असताना क्षणिक सुखासाठी कधी कधी काही माणसं मोह,भय,पूर्वग्रह,सुडबुध्दीमुळे विकेकाचा बळी देऊन नको त्या कृती आणि उक्ती करतात.
असं करताना त्यांचं मन त्यांना सांगत असते,'तू जे काही करतोस ते योग्य करत नाहीस.यालाच आतला आवाज म्हणतात. तरी पण यावेळी कोणता तरी विकार अधिक उचल खातो ,विचाराचा खून होतो.विचार थोड्या काळासाठी पराभूत होतो अन् विकाराचा विजय होतो.
या विजयाचे आयुष्य फार कमी असते.
विचाराचा खून केलाय, हे लक्षात येते,ह्या लक्षात येण्याला म्हणतात प्रश्चाताप.
शरीराला आलेला ताप गोळीनं थंड होऊ शकतो पण
पश्चातापावर ही गोळी काम करु शकत नाही.
पुन्हा ही घोडचूक करायची नाही हा निर्धार घेऊन
स्वत:ला क्षमा करून ज्यांना वेदना प्रदान केली त्याची मनोभावे माफी मागितली तर पश्र्चातापरूपी ज्वर
डोकं वर काढत नाही, तो शांत होऊ लागतो.पश्चातापाचा
अग्नी तसाच ठेवून, त्याला दाबून टाकून कोणताही मनुष्य
सुखाने जगू शकत नाही.
गाढ विश्रांती घेऊ शकत नाही.अशी विश्रांती गमावलेल्या
मनुष्याच्या जगण्यात कृतार्थ नसते.उत्साह, सात्त्विक आनंद
आत्मिक बळ
निघून जाते. स्वत:च्या नजरेतून पडतो.
स्वत:च्या नजरेतून पडलेली माणसं दुस-याच्या,सद्गुणी माणसांच्या नजरेत भरत नाहीत.घरंचेही कंटाळतात,
अनेक जण टाळतात.तरी पण अशी माणसं ओढूनताणून
चार माणसात आपण सुखी असल्याचे भासवतात.खरं ते आतून नासलेले असतात.
असलं नासलेपण दूर करण्यासाठी अहंकाराला दूर ठेवून
सत्संग, सद्भावना विधायक विचार आणि कार्याची कास धरून नम्रपणे वाटचाल करणं सुखी जीवनाचा एक राजमार्ग ठरेल
डॉ हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com
डॉ हनुमंत भोपाळे
सद्सदविवेकबुध्दीचा वापर करून केलेली कृती आणि उक्ती आत्मिक समाधान देते.
असे असताना क्षणिक सुखासाठी कधी कधी काही माणसं मोह,भय,पूर्वग्रह,सुडबुध्दीमुळे विकेकाचा बळी देऊन नको त्या कृती आणि उक्ती करतात.
असं करताना त्यांचं मन त्यांना सांगत असते,'तू जे काही करतोस ते योग्य करत नाहीस.यालाच आतला आवाज म्हणतात. तरी पण यावेळी कोणता तरी विकार अधिक उचल खातो ,विचाराचा खून होतो.विचार थोड्या काळासाठी पराभूत होतो अन् विकाराचा विजय होतो.
या विजयाचे आयुष्य फार कमी असते.
विचाराचा खून केलाय, हे लक्षात येते,ह्या लक्षात येण्याला म्हणतात प्रश्चाताप.
शरीराला आलेला ताप गोळीनं थंड होऊ शकतो पण
पश्चातापावर ही गोळी काम करु शकत नाही.
पुन्हा ही घोडचूक करायची नाही हा निर्धार घेऊन
स्वत:ला क्षमा करून ज्यांना वेदना प्रदान केली त्याची मनोभावे माफी मागितली तर पश्र्चातापरूपी ज्वर
डोकं वर काढत नाही, तो शांत होऊ लागतो.पश्चातापाचा
अग्नी तसाच ठेवून, त्याला दाबून टाकून कोणताही मनुष्य
सुखाने जगू शकत नाही.
गाढ विश्रांती घेऊ शकत नाही.अशी विश्रांती गमावलेल्या
मनुष्याच्या जगण्यात कृतार्थ नसते.उत्साह, सात्त्विक आनंद
आत्मिक बळ
निघून जाते. स्वत:च्या नजरेतून पडतो.
स्वत:च्या नजरेतून पडलेली माणसं दुस-याच्या,सद्गुणी माणसांच्या नजरेत भरत नाहीत.घरंचेही कंटाळतात,
अनेक जण टाळतात.तरी पण अशी माणसं ओढूनताणून
चार माणसात आपण सुखी असल्याचे भासवतात.खरं ते आतून नासलेले असतात.
असलं नासलेपण दूर करण्यासाठी अहंकाराला दूर ठेवून
सत्संग, सद्भावना विधायक विचार आणि कार्याची कास धरून नम्रपणे वाटचाल करणं सुखी जीवनाचा एक राजमार्ग ठरेल
डॉ हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com
No comments:
Post a Comment