Sunday 26 April 2020

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणं बरं नव्हे!
  डॉ हनुमंत भोपाळे
माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सध्या महाराष्ट्रातील जनतेला कोरोनाच्या संकटातून सोडविण्यासाठी व्यस्त आहेत.अशा परिस्थितीत त्यांना त्या पदावरून दूर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही.
खरं तर कोरोनारूपी  विश्र्वाला जीव घेणारं संकट आहे.जागतिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे.आपल्याकडे निवडणूक आयोगाने निवडणूका पुढे ढकल्या आहेत.अशा परिस्थितीत माननीय श्री.उध्दव ठाकरे स्वत:चं निवडणूक कार्यक्रम जाहीर करून
विधानसभेवर जाऊ शकत नाहीत.
सहा महिन्यांच्या आत त्यांनी विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य होणे गरजेचे आहे, हे मान्य आहे पण निवडणूक झाली नाही तर काय करायचे, यासंबंधी कायदा काही सांगत नसेल तर अशा परिस्थितीत सद्सदविवेकबुध्दीचा वापर करून , परिस्थितीचे गांभीर्य ओळखून न्याय असा निर्णय घेणे अपेक्षित असते.
जनमत तर उध्दव ठाकरे यांच्या सोबत आहे.आज जरी निवडणूक घेतली तरी प्रतिस्पर्धी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते.
असे असताना काहीजणांनी विकृत,सुडबुध्दीचे राजकारण सुरू केले आहे.
तुम्ही राजकारण अवश्य करा
पण ही ती वेळ नव्हे!
उलट सर्वपक्षांनी माननीय राज्यपाल महोदयांना विनंती केली पाहिजे,आमची मातृभूमी,आमचा महाराष्ट्र संकटात आहे.आपला विशेष अधिकार वापरून
माननीय उध्दव ठाकरे यांना विधानपरिषदेवर सदस्य म्हणून  महाविकास आघाडीने विनंती केली आहे ती मान्य करा असे सांगितले पाहिजे.
यामुळे महाराष्ट्रातील जनतेत एक सकारात्मक संदेश जाईल.
माननीय उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्याचं  षंढयंत्र खरंच अन्यायकारक आहे.
विद्यार्थ्यांची पदवी परीक्षा न घेताच
तुम्ही पदवी पास झाल्याचे प्रमाणपत्र सादर करा म्हणणं जितके अन्यायकारक आहे,त्याही अधिक अन्यायकारक
माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विधानसभेत
निवडून या असे सांगणे होय.
उध्दव ठाकरे तांत्रिक अडचणीत सापडतील अन् त्यांचं मुख्यमंत्री पद जाईल म्हणणा-यांनी कोरोनामुळे कायदाचं अडचणीत सापडला आहे,असा का विचार करू नये?
सत्तेसाठी माणसं कोणत्याही थराला जातील पण
जनता अशा कठिण परिस्थितीत केलेल्या माकडचेष्टा सहन करणार नाही.
बरं,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून दूर केल्याने तुम्ही थोडेच मुख्यमंत्री होणार आहात?
असं काही होणार नाही, उलट परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मा. उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून कायदेशीर पेच सोडविणे शहाणपणाचे ठरेल.
हा विषय न्यायालयात गेला तर न्याय
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच मिळणार आहे.
उध्दव ठाकरे न्यायालयाला विचारू शकतात
मला निवडणूक लढण्याची संधी उपलब्ध करून न देताच मला अपात्र कसे काय ठरवणार आहात?
मा.न्यायालय नक्कीच सकारात्मक निर्णय देऊ शकते.
डॉ. हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com

No comments:

Post a Comment