Monday 20 April 2020

खरंच साहित्यक जास्त  झाले आहेत का?
 ग्रंथांना मागणी वाढत नाही का ?
डॉ हनुमंत भोपाळे




'लेखन करणाऱ्यांचा सुकाळ झालाय,दगड काढला
की विंचू दिसावा तसे कवी , साहित्यिक दिसत आहेत' असे एक जण म्हणाला.
त्याला म्हणालो,"असं तुम्ही लिहा"
तो म्हणाला,"मी काही लेखक नाही हो"
जे बोलत आहात तेच लिहा
असे म्हणल्यावर त्याचं म्हणणं होतं की,नका
कशाला ?
टीका होते.
मी म्हणालो," लिहिल्याने टीका होते म्हणून  भीती वाटते
तर मग बोलल्याने टीका होतेच की"?यावर
तो गप्प बसला?
त्याला विचारलो,
'बरं तुम्हाला या लिहि-याकडून काही त्रास आहे का ?'
तो म्हणाला, "त्रास नाही पण
त्याचे पेपरात नाव छापून येतात, लयी मिरवतात"
'म्हणजे तुम्हाला त्यांचा नावलौकिक तुम्हाला सहन होत नाही का'?
यावर तो म्हणाला," मला आता कशाला लिहियाचं
पूर्वीच खूप लिहून ठेवले आहे तेच वाचा म्हणावं ना?
साहित्य कोण वाचते सध्या?
आता सोशल मीडिया आहे.खंडीभर वाहिन्या झाल्यात.
साहित्याला कोण विचारते?
असे विजयी स्वरात म्हणाला.
तुम्हाला साहित्य म्हणजे काय माहित आहे? असे विचारल्यावर तो म्हणाला,
"साहित्यिक लिहितात ते साहित्य.
या साहित्याला सध्या तरी काही किंमत नाही.
स्वत:चे पैसे टाकायचे आणि छापून आणायचं
असला प्रकार चालू आहे" ?

त्यांचे पैसे खर्च करून छापून आणत असतील, तुम्हाला काय अडचण आहे?
असे विचारल्यावर
त्यांचं म्हणणं होतं की,
"आणून घरातच ठेवून कुठे बसतात
ते कुणालाही भेट देत फिरतात
फेसबुकवर टाकतात
ते मला आवडत नाही. पाहवत नाही"

तुम्ही फोटो टाकत असता ना?
तुमच्या फोटोचा त्रास इतरांना होत नाही का?
असे विचारल्यावर तो म्हणाला,"
आमचे फोटो साहित्यिक सारखं नसतात.
पुस्तक देताना,भाषण देताना
असला प्रकार  आमचा नसतो."
मग कसला असतो? मी विचारलो
तो म्हणाला,"
आम्ही हाँटेलमध्ये जेवण करताना,
गाडी चालवताना, मित्रांसोबत भेटल्यावर,
लेकरासोबत खेळतानाचे आमचे फोटो अपलोड केलेले असतात."
या फोटोचा त्रास होत असेल की कुणाला?
त्याचं म्हणणं होतं की
'आमच्या फोटोत त्रास होईल असे काही नसते.'

साहित्यिकांच्या फोटोत काय त्रास होण्यासारखं असते?
असे विचारल्यावर तो म्हणाला,"
तसला नाटकीपणा मला आवडत नाही.
साहित्यिकाचे फोटो नाटकी असतात.
आमचे फोटो सोज्वळ असतात.'

बरं तुम्ही म्हणालात ,'सोशील मिडिया
चित्रपटाला सध्या महत्त्व आहे.
साहित्याला काही  किमंत नाही
तुम्हाला माहिती आहे का
चित्रपट हे कुणी तरी लिहिलेल्या
साहित्यावर असतात.
विनोद सुध्दा साहित्य आहे.
सोशल मिडीयावर येणारे जोक्स, विनोदी किस्से,गाणे, सुविचार
हे पण साहित्य आहे.सोशील मिडियामुळे
साहित्य जास्त वाचलं जात आहे.
पुस्तकं वाचलं म्हणजे साहित्य वाचले असे कशाला समजायचे.
उलट आज इंटरनेटवर  साहित्य सहज उपलब्ध आहे.
आठवल की वाचक शोधून वाचत आहे.
लाखो पुस्तक एका क्लिकवर उपलब्ध आहेत.
अनेक साहित्यकृतीला , ई-बुक्सला इंटरनेटवरून मागणी आहे.
मुद्रित स्वरूपात आलेले पुस्तक रोज खरेदी केले जात आहेत.
मला सांगा पुस्तकाचे दुकान,ग्रंथालय,ई- ग्रंथालय
वाढतच आहेत ना?
कोट्यवधी माणसं रोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमातून साहित्याचा आस्वाद घेत आहेत.'
असे म्हणल्यावर तो म्हणाला",हेही खरे आहे."

 वाईट व्यसनाचे प्रमाण वाढत आहे, दहशतवादी वाढत आहेत याबद्दल काही बोलत नाही.
असे विचारल्यावर तो म्हणाला"
ते लोक बरे नसतात
कशाला बोलू
आ बैल मुझे मार
मज्यानं होतं नाही."
त्यांना विचारलो,
आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे?
त्यांने सांगितले,एकशे पस्तिस कोटीच्यावर आहे?
साहित्यिक किती आहेत?
चार दोन कोटी आहेत का?
यावर तो म्हणाला,'
नाही तेवढही नाहीत.
लाखामागं एखादा असेल.
नाही तुम्हीच म्हणालात की
'दगड उचलला की, साहित्यिक सापडलाय'?
बरं तुम्ही शिकलात लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात
त्यांना भाषेच्या पुस्तकात कथा कविता, लेख
असतात.साहित्य माणसांवर संस्कार करते.
संस्काराशिवाय विकार दूर होत नसतात.
साहित्य मनोरंजन करते
ज्ञान देते.
साहित्य म्हणजे त्या त्या राष्ट्राचे वैभव असते.
साहित्य म्हणजे समाजाचं होकायंत्र
अनेक धोकांच्या जाणीव करून देते.
साहित्यामुळे वैचारिक, बौद्धिक मानसिक भूकच नाही तर अनेकांच्या पोटाची भूक भागवते.
अनेक नाट्य, चित्रपट,मालिकेचे कलावंत साहित्यावर उदरनिर्वाह करतात.
साहित्य फार विशाल आणि प्राचीन आहे.
हजारो वर्षांपासून अक्षर स्वरूपाचे लोकवाड्मय निरक्षर
माणसांनी निर्माण केले,जतन केले.
कितीही सांगितलं तितकं कमीच आहे
साहित्याचे महात्म्य.
जगाचं वैर घेऊन,खस्ता खाऊन लेखन करतात
झोप मोड करून लिहतात.
पदरमोड छापून आणतात.
याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचं नसेल तर करू नको
किमान कृतघ्नपणा तरी नको.'
तेव्हा तो खाली मान घालून म्हणाला,
"जाऊ द्या हो आता"
काल एका साहित्यिकाला गाडी मागल्यानं
त्यानं दिला नाही.
 तो म्हणाला,
"दिलो असतो पण कविसंमेलनाला चाललो"
म्हणून मला साहित्यिक लोकांचा राग आला.
मला वाटलं हा जर साहित्यिक नसला असता तर मला गाडी मिळाली असती?"
असे म्हणून निघून गेला.

डॉ हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com

No comments:

Post a Comment