सोपं आणि अवघड यापेक्षा आवश्यक ते करण्याची गरज
डॉ.हनुमंत भोपाळे
प्रत्येक माणूस कोणती ना कृती उक्ती करत वाटचाल करतो. काहीजण कुणी तर करत आहेत,आपण त्यासारखं काही करावं म्हणून करतात.काहीजण आपल्या सहवासातील जे करता त्यांच्याविरोधी, उलट करतात. विरोधाला विरोध एवढाच त्यांचा कार्यक्रम असतो.
काहीजण म्हणतात"मला कुणाचही अन् कशाचं देणंघेणं नाही,मला जे वाटते, जसं वाटते तसं करतो."
काहीजण सोपं काय आहे,ते करतो,अवघड असेल मला जमत नाही.मी करत नाही, असे बोलतात.
अवघड आहे,ते करायचं म्हटलं की, त्यांना घाम फुटतो.
खरं तर आवड,निवड, सोपं आणि अवघड यासर्व बाबींपेक्षा आवश्यक, अत्यावश्यक काय आहे, याचा विचार करून त्या गोष्टी साध्य करायला पाहिजे तरच आपल्याला फायदा होईल.
जे आपल्याला जमतं नाही असं वाटते ती गोष्ट आपण अवघड समजतो.अवघड वाटणारी गोष्ट सोपी करण्यासाठी काय करणे, कसं करणं आवश्यक आहे याचा विचार केला पाहिजे.जी माणसं ह्या अवघड गोष्ट करत आहेत, त्यांचे मार्गदर्शन,तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तींचे सहकार्य घेतल्यास फायदा होतो. घेणे.
क्लास वन अधिकारी पदाच्या मुलाखतीच्या वेळी
मुलाखत घेणा-यांनी विचारले जात होते की, 'तुम्ही ज्या भागात नोकरी करणार आहात,त्या ठिकाणी पाच सहा भाषेत संवाद साधून काम करावं लागणार आहे,ते शक्य आहे का?'
या प्रश्नाला अनेक उमेदवार नाही असे उत्तर देत होते.
एक उमेदवार म्हणाला,"ते शक्य आहे.
कारण मला प्रादेशिक भाषा मराठी, राष्ट्रीयभाषा हिंदी चांगली जमते इंग्रजी भाषाही ब-यापैकी समजते.जे आवश्यक आहे ते मी सतत शिकत आलो आहे.पुढेही शिकेलच. स़ंपर्क,सहवास , मार्गदर्शन आणि अभ्यास यांच्या बळावर मला इतर भाषा लवकर शिकणं शक्य आहे,याची खात्री देतो. एखाद्या वेळी गरज वाटलीच तर दुभाषिक कर्मचाऱ्यांची मदत घेईल."
संवाद साधण्याचा हेतू काम करणे हा आहे तर मी भाषेमुळे कुणाचेही काम अडू देणार नाही.
याचे उत्तर सर्वांना पटले आणि त्याची निवड झाली.
काहीजणांना जमत नाही असे म्हणण्याची इतकी सवय झाली आहे की,काहीही विचारा त्याचं उत्तर असते
' मला जमत नाही,मला शक्य नाही.मी करत नाही.तुला काय करायचे आहे,मी मरून जाऊ दे. मज कसंही होऊ दे,'
बेकायदेशीर, अनावश्यक,विषय बाह्य बाबींना नाही म्हणावे लागते . आपल्या क्षेत्रातील जे करणे आवश्यक त्या बाबींना आपण सतत नकार देत, पाढा वाचत
जगू लागलो तर आपण नालायक, बिनकामाचे ठरतो.बिनकामाची बाब फेकून दिली जाते.तिला बाजूला ठेवले जाते. कधी कधी काही तरी काम द्यायचं म्हणून अशा व्यक्तीला बिन महत्त्वाचे, अनावश्यक काम सांगितले जातात,बिन महत्त्वाचे काम करून कुणीही महत्त्वपूर्ण बनतं नसते.
सरकारी नोकरीत कसं तरी सहन करतात,पण खाजगी क्षेत्रात जमत नाही म्हटलं की बाहेरचा रस्ता दाखवला जातो.
असाध्य ते साध्य/ करिता सायास
कारण अभ्यास/तुका म्हणे
यावर श्रद्धा ठेवून आवश्यक ते करत गेलो की, अवघड वाटणारं हळूहळू जमते.काही ना मार्ग निघतो.
जन्मल्या बरोबर कुणी पळत नाही. हळूहळू पळण जमते.एक एक पाऊल योग्य आणि आवश्यक दिशेने टाकत गेलो तर नक्कीच प्रवास होतोच.
कुणी आईच्या पोटातून शिकून येतं नाही.आज आपल्या ज्या गोष्टी जमतात, त्या आपण शिकलो आहोत.आपल्या
कुणी तरी शिकवलं आहे.
मनापासून शिकण्याची इच्छा हवी.ती बाब अत्यंत गरजेची असेल तर नक्कीच ती बाब साध्य होते.
एक पाऊल टाकून तर पहा मागचा पाय पुढे नेण्यासाठी तयारच आहे
Sir khup chan article ahe khup aavdla
ReplyDeleteThanks sir
ReplyDeleteखूप छान विचार आहेत. ब्लॉग लेखन नियमित चालू ठेवावे म्हणजे आम्हांला रोज काही वाचन करता येईल
ReplyDeleteThanks सर
ReplyDelete